Posts

Showing posts from August 14, 2020

जिल्ह्यात कोरोनाचे  नवीन ५३ रुग्ण तर ३० रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज

जिल्ह्यात कोरोनाचे  नवीन ५३ रुग्ण तर ३० रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज   कोरोना आलेख काही कमी होईना हिंगोली,- जिल्ह्यात आज ५३ नवीन कोरोनाचा रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास यांनी दिली आहे.त्यामुळे जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आलेख काही केल्या कमी होताना दिसून येत नाही ,हे आकडेवारीवरून दिसून येत आहे.   आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार कळमनुरी परिसर २३ व्यक्ती, कळमनुरी ग्रामिण १० व्यक्ती, वसमत परिसर ८ व्यक्ती, औंढा परिसर ६ व्यक्ती, सेनगांव परिसर १ असे एकुण ४८ रुग्ण हे रॅपिड ॲन्टीजन टेस्टद्वारे पॉझिटिव्ह आले आहे. तर कळमनूरी तालुक्यात ५ व्यक्ती आरटीपीसीआर टेस्टद्वारे आढळून आले आहेत.  आज ३०  रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. सद्यस्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोरोना रुग्णांपैकी ८ रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. तर  ३ रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्याने त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. असे एकूण ११ रुग्णांची सद्यस्थितीत प्रकृती च...

फिस मध्ये वाढ केल्यास संस्थाचालकावर कारवाई करणार शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड

Image
फिस मध्ये वाढ केल्यास संस्थाचालकावर कारवाई करणार - शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड हिंगोली -  राज्यात कोरोना प्रादुर्भाव वाढत असल्याने शैक्षणिक संस्था बंद आहेत. मात्र शैक्षणिक संस्था हया ऑन लाईन क्लासेसच्या नावाखाली फिवाढ करीत असल्याचा पालकांच्या तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे शिक्षण संस्थांनी फी मध्ये वाढ केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी पत्रकारांना सांगितले . जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड हया स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने हिंगोली दौऱ्यावर आल्या असता त्या येथील जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी बैठकी साठी आल्या होत्या, यावेळी पत्रकारांनी शैक्षणिक संस्था हया  सक्तीने फी मध्ये वाढ झाल्याचे सांगून पालकांकडून पैसे उकळत असल्याचा मुद्दा छेडला असता, यावर पालकमंत्री म्हणाल्या की,सध्या कोरोना प्रादुर्भाव वामुळे पालकांची  फी भरण्यास परिस्थिती नाही, असे सांगून काही लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत.तर काहींच्या पगारात कपात झाली आहे, तर काहींचे व्यवसाय बंद पडले आहेत. त्यामुळे पालकांची फी भरण्यास मनस्थिती राहिली नसल्य...