Posts

Showing posts from June 5, 2020

शासन निर्देशानुसार आता ई-पासची सेवा राहणार नाही

शासन निर्देशानुसार आता ई-पासची सेवा राहणार नाही हिंगोली -  जिल्‍ह्‍यासह परराज्यात अत्यावश्यक व वैद्यकिय कारणासाठी अडकून पडलेल्या व्यक्‍ती, मजुरांना त्‍यांच्या इच्‍छितस्‍थळी जाण्यासाठी शासनातर्फे ई-पासची व्यवस्‍था करण्यात आली होती. पंरतू आता शासन निर्देशानुसार आता ही सेवा राहणार नसल्याचे निर्देश प्राप्त झाल्याचे जिल्‍हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.  यासाठी दिलेल्या अटीनुसार परवानगी देण्यात येणार आहे. प्रवास करताना दोनचाकी वाहन केवळ एक व्यक्‍तीसाठी (चालक), तीन चाकी वाहने एक अधिक दोन व्यक्‍तीसाठी  (चालक अधिक दोन) यानुसार प्रवास करण्यास परवागी असेल परंतू सर्व प्रवासी व चालकांचे वैद्यकिय तपासणी केलेले प्रमाणपत्र सोबत बाळगणे आवश्यकतेनुसार चेक पोष्टवर हजर असलेल्या अधिकारी कर्मचारी यांना दाखविणे बंधनकारक असेल.  चेकपोष्टवरील नियुक्‍त अधिकारी, कर्मचारी यांनी येणाऱ्या व जाणाऱ्या प्रवाशांची थर्मलगणद्वारे तपासणी करावी तसेच प्रवाशांची माहिती यात नाव, प्रवासी संख्या कोठून आले कोठे जायचे अशी माहिती नोंदवहीत घ्यावी ही माहिती आरोग्य व संबधीत विभागाला ...

लातुरात भाग्यनगर येथे 01, औसा यथील 02 एकूण 03 पॉझिटीव्ह तर 06 रुग्णास डिस्चार्ज

Image
                  दिनांक 05.06.2020   *जिल्ह्यात आज 54 पैकी 51 व्यक्तींचे स्वाब रिपोर्ट  निगेटीव्ह तर 03 पॉझिटीव्ह* *एक पॉझिटिव्ह रुग्ण लातूर शहरातील भाग्यनगर व दोन रुग्ण हिप्परगा ता. औसा येथील पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील* *जिल्ह्यात आजपर्यंत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 41, उपचाराने बरे झालेल्या रुग्णांची संख्या 100 व मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 04* विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत दिनांक 05 जुन 2020 रोजी लातुर जिल्हयातील एकुण 54 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी या संस्थेतील 20 व्यक्तींचे स्वॅबपैकी 19 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन *एका व्यक्तींचा अहवाल पाझिटीव्ह  आला आहे. ही व्यक्ती जीवन आशा इमारत, नरहर कुरुंदकर मार्ग भाग्य नगर लातूर* येथील रहिवासी असून त्यांना ताप, खोकला व दम लागत असून त्यांना शुगरचा आजार आहे. 04 जून रोजी सांगली येथून प्रवास करून आलेले आहेत. दिनांक 04 जून 2020 रोजी या संस्थेच्या रुग्णालयात दाखल झाले होते अशी माहिती कोरोना विलगीकरण कक्षाचे प्रमुख डॉ. मारुती कर...

धक्कादायक हिंगोलीत पुन्हा नव्याने सहा पॉझिटिव्ह

Image
हिंगोलीत पुन्हा नव्याने सहा पॉझिटिव्ह  रुग्ण संख्या पोहचली ३१ वर हिंगोली -  हिंगोलीत शुक्रवारी   अंधारवाडी येथील क्‍वारंटाईन सेंटरमध्ये भरती असलेल्या सहा व्यक्‍तींना कोरोनाची लागण झाल्याचे  अहवालातून स्‍पष्ट झाले असून आता कोरोना बाधीताची  संख्या ३१ वर  गेल्याची माहिती जिल्‍हा शल्‍यचिकित्‍सक डॉ.  किशोरप्रसाद श्रीवास यांनी दिली.  शुक्रवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार क्‍वारंटाईन सेंटर  अंधारवाडी येथील भरती असलेल्या सहा व्यक्‍तींना कोरोनाची लागण झाल्याचे अहवालातून स्‍पष्ट झाले आहे. या रुग्णात २८  वर्षीय महिला व ११ वर्षीय मुलगा हे रिसाला बाजार येथील कोरोना रुग्णाच्या कुटूंबातील व्यक्‍ती आहेत. व सर्वजण मुंबई मधुन हिंगोलीत आलेले आहेत. ते आल्यापासून अंधारवाडी येथील क्‍वारंटाईन सेंट येथे भरती आहेत.   तसेच यात एक ३३  वर्षीय पुरुष नगरपरिषद कॉलनी हिंगोली येथील रहिवासी आहे. तो व त्‍याचे कुटूंब पुणे येथून हिंगोली येथे आलेले आहेत. यासह ३० वर्षीय पुरुष २७ वर्षीय महिला व ९ वर्षाची मुलगी हे सर्व एका कुटूंबातील  सदस्य असून ते मुं...