Posts

Showing posts from February 17, 2020

बच्चे कंपनींच्या बहारदार फॅशन शो मधे  अभिनेता अंकुश चौधरीने मुलांबरोबर केला रॅम्पवॉक.

Image
बच्चे कंपनींच्या बहारदार फॅशन शो मधे  अभिनेता अंकुश चौधरीने मुलांबरोबर केला रॅम्पवॉक.       अनिल चौधरी, पुणे    मुलांच्या अंगातील सुप्त कलागुणांना वाव मिळावा तसेच लहानपणीच 'स्टेज फीयर' नाहीसे होऊन व्यासपीठावर आत्मविश्वासाने वावरता यावे या उद्देशाने सत्यजित जोगळेकर यांनी किड्समंच ची स्थापना केली आहे. किड्समंच आणि 'माय पपेट स्टोरी' यांच्या संयुक्त विद्यमाने  'किड्स फॅशन शो' हा पहिला उपक्रम औंध येथील वेस्टेंड मॉल येथे पार पडला.  कार्यक्रमाची सुरवात बाल कलाकार जीजा परांजपे हिच्या फ्युजन नृत्याने झाली. वय वर्षे अडीच  ते नऊ अशा विविध वयोगटातील तब्बल ६५ मुलामुलींनी देशी, विदेशी, फ्युजन प्रकारातल्या पेहेरावात बहारदार रॅम्पवॉक करुन प्रेक्षकांना अचंबित केले. ऐटीत डौलदार पावलं टाकत प्रेक्षकांकडे पाहून स्मितहास्य करत वेगवेगळ्या 'पोज' देणाऱ्या या बालचमुंचा आत्मविश्वास वाखाणण्याजोगा होता. कार्यक्रम ऐन बहरात असतानाच स्टेज वरून अभिनेता अंकुश चौधरी ने एंट्री घेत मुलांबरोबर रॅम्पवॉक करत प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का दिला.  योगजा कुलकर्णी यांनी मुलांसाठी...

यंदा ही कॉपी मुक्त अभियान राबविणार जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी

  यंदा ही कॉपी मुक्त अभियान राबविणार   जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी   हिंगोली - माध्यमिक व उच्य माध्यमिक परीक्षा मंडळ पुणे मार्फत जिल्ह्यात मंगळवार (ता.१८) पासून परीक्षेला सुरुवात होत आहे. या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पाडल्या जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिली.   मागील सात वर्षांपूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी नरेंद्र पोयाम यांच्या कार्यकाळात जिल्ह्यात कॉपी मुक्त अभियान राबविण्यात सुरुवात झाली. तेव्हापासून कॉपी मुक्त अभियान बारावी व दहावी परिक्षे दरम्यान राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात ३३ केंद्रावर परीक्षा घेतली जात आहे. त्यानुसार परीक्षेतील कॉपीला आळा घालण्यासाठी हे अभियान यंदा ही राबविण्याचा निर्णय झालेल्या दक्षता बैठकीत घेतला असल्याचे सांगून, भरारी व बैठे पथकाला देखील सूचना दिल्या आहेत. जर परिक्षे दरम्यान एखादा विद्यार्थी कॉपी करीत असेल तर त्या विद्यार्थ्यांवर कारवाई करून रेस्टीकेट करण्याचे आदेश दिले आहेत. कॉपी मुक्त अभियानामुळे हुशार विद्यार्थ्यांना चांगली प्रगती करता येईल आणि पुढे त्यांना मेडिकल, इंजिनिअरिंग साठी सहज शक्य होईल असे त्यांनी ...

मराठवाड्यातील महत्वपूर्ण रेल्वे योजनांना गती देण्यात यावी

Image
मराठवाड्यातील महत्वपूर्ण रेल्वे योजनांना गती देण्यात यावी   परभणी ( प्रतिनिधी ) दि.17ः-     मराठवाड्यात सर्वात जास्त प्रवाशी वर्दळ असलेल्या परभणी-मनमाड या मंजुर करण्यात आलेल्या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण युद्धस्तरावर सुरू करण्यात यावे. मराठवाडा विभागाची राजधानी आणि  महत्वपूर्ण पर्यटन केंद्र औरंगाबाद स्थानकावर पीटलाइन सुविधा उपलब्ध करणे गरजेचे आहे. मागासलेल्या मराठवाडा विभागाच्या विकासासाठी निर्माणाधीन परळी-बीड-नगर-कोळसेट (कल्याण जवळ) अकोला-खंडवा आणि नांदेड-यवतमाळ-वर्धा रेल्वे मार्गांना पूर्ण करण्यात यावे. सोबतच विभागात आवश्यक असणार्या औरंगाबाद-नगर-पुणे,  औरंगाबाद-चाळीसगाव, नांदेड-बिदर, औरंगाबाद-बीड-सोलापूर, जालना-खामगाव, परभणी-जिंतूर- लोणार- मेहकर-बुलढाणा- मलकापूर आणि लातूर-गुलबर्गा दरम्यान नवीन रेल्वे मार्गांना मंजुरी देऊन तत्काळ निर्मिती करण्याची गरज आहे. या नवीन रेल्वे मार्गांसोबत पुणे व पश्चिम महाराष्ट्राला जवळून जोडणार्या  पानगाव-लातूर, अमरावती, नागपूर भागांना जवळून जोडणार्या वाशीम-बडनेरा, शिर्डीला जवळून जोडणार्या  रोटेगाव-पुणतांबा, आणि दक्षिण भारत...

३३ केंद्रावर १३ हजार विद्यार्थी देणार आज  बारावीची परीक्षा

Image
३३केंद्रावर १३हजार विद्यार्थी देणार आज  बारावीची परीक्षा   हिंगोली - शालांत माध्यमिक व उच्य माध्यमिक मंडळाच्या वतीने मंगळवारी (ता.१८) जिल्ह्यातील ३३ परीक्षा केंद्रावर  १३ हजार २५२ विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार असून परीक्षेची जय्यत तयारी शिक्षण विभागाने केली असल्याची माहिती शिक्षणाधिकारी पी.बी. पावसे यांनी दिली आहे.   माध्यमिक व उच्य माध्यमिक मंडळ पुणे यांच्या वतीने ता.१८ फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत बारावीच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत.आज इंग्रजी विषयाचा पहिला पेपर सकाळी अकरा ते दोन यावेळेत घेतला जाणार आहे.  जिल्ह्यातील ३३ केंद्रावर १३ हजार २५२ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.यामध्ये हिंगोली आठ केंद्र, कळमनुरी पाच, वसमत दहा,औंढा पाच, तर सेनगाव पाच असे एकूण मिळून ३३ केंद्राचा समावेश  आहे.   जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी ,जिल्हा परिषदेचे सीईओ यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणाधिकारी पी. बी.पावसे,उपशिक्षणाधिकारी मलदोडे, पळसकर, वडकुते, गटशिक्षणाधिकारी आदी परीक्षेची जोरदार तयारी केली आहे.परीक्षेसाठी ६७०पर्यवेक्षकांची नियुक्ती केली आहे. तर ३३ केंद्रसंचालक ...