वाहन मालक ऐकत नसतील तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करा जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी
वाहन मालक ऐकत नसतील तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करा जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी हिंगोली - मागील तीन दिवसानंतर सोमवारी अत्यावश्यक सेवा सुरू झाल्याने रस्त्यावर पुन्हा वाहनांची गर्दी दिसून आली तर भाजीपाला व किराणा दुकानावर आदेशाचे उल्लंघन करीत नागरिकांची गर्दी पाहावयास मिळाली .यावेळी विश्रामगृहा शेजारील रस्त्यावर तीनचाकी वाहने, दुचाकी वाहनांची गर्दी खुद्द जिल्हाधिकारी जयवंशी यांना दिसून आल्याने त्यांनी काही वाहने जप्त करीत वाहन मालक यापुढे ऐकत नसतील तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी वाहतूक शाखेच्या पोलिसांना दिले . जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने, खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने शुक्रवार ते रविवार असे तीन दिवस सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती.त्यामुळे सोमवारी पुन्हा दहा ते एक यावेळेत किराणा दुकान, भाजीपाला दुकाने उघडल्याने नागरिकांनी साहित्य खरेदी साठी चक्क वाहने आणून रस्त्यावर लावल्याने पुन्हा सर्व ठिकाणी गर्दी दिसून आली. एकीकडे जिल्हा प्रशासन गर्दीवर नियंत्रण ठेऊन कोरोना वर कसा विजय मिळवायचा यावर प्रयत्न करीत...