Posts

Showing posts from March 11, 2020

संत मारोतराव महाराज जन्मशताब्दी सोहळया निमित्त मनपामध्ये बैठक

संत मारोतराव महाराज जन्मशताब्दी सोहळया निमित्त मनपामध्ये बैठक परभणी(प्रतिनिधी)दि.11ः- संत मारोतराव महाराज दस्तापूरकर यांच्या जन्मशताब्दी सोहळयानिमित्त महापौरांच्या दालनात बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये ह.भ.प.अच्युत महाराज दस्तापूरकर, उप आयुक्त गणपत जाधव, रविंद्र सोनकांबळे, इमरान हुसेन, विनोद कदम, प्रविण गोमचाळे, शहर अभियंता वसीम पठाण, सहाय्यक आयुक्त शिवाजी सरनाईक, मुस्कदीप खान, अल्केज देशमुख, मुख्य स्वच्छता निरिक्षक करण गायकवाड, आरोग्य अधिकारी डॉ.कल्पना सावंत यांच्या उपस्थितीमध्ये बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये संत मारोतराव महाराज दस्तापूरकर यांच्या भव्यदिव्य ग्रंथराज भागवत कथा, ज्ञानेश्वरी पारायण, आखंड हरिनाम सप्ताह दि. 8 एप्रिल ते 15 एप्रिल संत तुकाराम महाविद्यालय प्रांगणात होणार आहे. या संदर्भात अधिकाऱ्यांना सुचना देण्यात आल्या. अच्युत महाराज म्हणाले की, महाराष्ट्रातील 23 जिल्हयातील भक्त येणार आहेत. 60 हजार नागरीक येणार आहेत. यासाठी महानगर पालिकेच्या वतीने पाईपलाईन टाकून 400 नळ देण्यात यावे तसेच स्वच्छता करून देण्यात यावी, आरोग्य केंद्र सुरू करण्यात येणार आहे. रोज रक्तदान शिबिर घे...

अरीबम शर्मा  जिल्हा परिषदेचे नवे सीईओ

अरीबम शर्मा  जिल्हा परिषदेचे नवे सीईओ   हिंगोली - राज्य शासनाने राज्यातील आठ आयएएस  अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश बुधवारी काढले असून त्यात हिंगोली जिल्हा परिषदेच्या सीईओ पदी नवे आयएएस अधिकारी म्हणून अरीबम शर्मा यांची रिक्त पदी नियुक्ती केली आहे.   दरम्यान, येथील जिल्हा परिषदेचे तत्कालीन सीईओ डॉ. एच. पी. तुमोड यांची औरंगाबाद येथे आठ दिवसांपूर्वी बदली झाल्याने त्यांची जागा रिक्त झाली आहे. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनवंतकुमार माळी यांच्याकडे  प्रभारी पदभार सोपविला आहे. त्यामुळे कामे मार्गी लागत आहेत. आता मार्च एन्ड असल्याने त्यातच जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प ही सादर करणे बाकी आहे.बुधवारी (ता.११)  राज्य शासनाने आठ आयएएस अधिकाऱ्यांच्या तातडीने बदल्याचे आदेश काढले आहेत. त्यापैकी मुंबई येथील ग्रामविकास मंत्रालयातील २०१२ बॅचचे आयएएस अधिकारी असलेले अरीबम शर्मा यांची नियुक्ती हिंगोली जिल्हा परिषदेच्या सीईओ पदी नियुक्ती केल्याने आता जिल्हा परिषदेला पूर्ण वेळ अधिकारी मिळाला आहे. मात्र ते कधी रुजू होतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.य...

पती -पत्‍नीच्या भांडणात नऊ वर्षाच्या चिमुकलीचा मृत्‍यू 

पती -पत्‍नीच्या भांडणात नऊ वर्षाच्या चिमुकलीचा मृत्‍यू    सेनगाव तालुक्‍यातील सवना येथील घटना    सेनगाव -   तालुक्‍यातील सवना येथे आई वडिलांचे भांडण सुरू असताना ते सोडविण्यासाठी मुलगी मध्ये गेली असता यावेळी रागाच्या भरात वडिलांनी तिच्याच डोक्‍यात लोखंडी रॉड मारला त्‍यामुळे गंभीर जखमी झालेल्या मुलीला रुग्णांलयात उपचारासाठी घेवून जाताना तिचा रस्‍त्‍यातच मृत्‍यू झाल्याची घटना बुधवार (ता.११) पहाटे घडली.    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनगाव तालुक्यातील सवना येथील विनोद देविदास भालेराव याचा त्याची पत्नी रत्नमाला विनोद भालेराव यांच्यासोबत मंगळवारी  रात्री वाद झाला होता. यावेळी विनोद याने पत्नी रत्नमाला यांना विचारलेल्या प्रश्‍नांना त्या उडवा उडवीची उत्तरे देत असल्याने त्यांच्यातील वाद विकोपाला गेला. यामध्ये विनोद याने रागाच्या भरात लोखंडी रॉडने रत्नमाला यांच्या डोक्यात वार केला मात्र त्यांनी हा वार चुकविल्यामुळे त्यांच्या तोंडावर रॉड लागला. त्यामध्ये त्यांच्या ओठाला गंभीर दुखापत झाली. त्यांच्या भांडणाचा आवाज ऐकून त्यांची मुलगी वैष्णवी (वय ९ ) ह...

कोरोना विषाणुच्या अशास्‍त्रीय अफवाकडे दुर्लक्ष करा जिल्‍हाधिकारी यांचे नागरीकांना आवाहन

कोरोना विषाणुच्या अशास्‍त्रीय अफवाकडे दुर्लक्ष करा   जिल्‍हाधिकारी यांचे नागरीकांना आवाहन    हिंगोली -  चीन व जगातील इतर देशांमध्ये नोव्हेल कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले आहे.  हा सांसर्गिक आजार असून एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे संक्रमित होतो. तथापि कुक्कुट पक्ष्यांकडून मानवामध्ये हा आजार संक्रमित होत नसल्याबाबत शास्त्रीय संदर्भ आहेत. या बाबत सोशल मीडीयावर पसरत असलेल्या अशास्‍त्रीय अफवांकडे दुर्लक्ष करावे असे आवाहन जिल्‍हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहे.      मांस व मांस उत्पादने ही उकळवून व शिजवून सेवन केल्या जाते  व त्या तापमानात कुठलेही विषाणू जिवंत राहू शकत नाहीत. राज्यात कुक्कुटपालन व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केल्या जात असून या व्यवसायाशी अनेक शेतकऱ्यांचे चरितार्थ व आर्थिक  हित जोडलेले आहे, पर्यायाने हा व्यवसाय राज्याच्या विकासाशी जोडलेला आहे. खोट्या अफवांमुळे कुक्कुटपालन व्यवसाय हा आर्थिक संकटात सापडला असून या व्यवसायाशी निगडीत लोकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.   गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडिया, ...

नांदेड येथील दोन युवकांचा शेततळयात बुडुन मृत्यू

नांदेड येथील दोन युवकांचा शेततळयात बुडुन मृत्यू वसमत - धुळवंड साठी नांदेड़ येथून तालुक्यातील पार्डी बागल शिवारात आलेले युवक शेततळयात पोहण्यासाठी गेले असता पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचा पाण्यात बुडुन मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी दुपारी घडली सदरील प्रकरणी उशीरा पर्यंत कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रीया चालु होती. वसमत तालुक्यातील पार्डी बागल शिवारात नरवाडे यांच्या शेतात ता.१० मार्च मंगळवार रोजी दुपारी धुळवंड साजरी करण्यासाठी नांदेड येथील तरुण आले होते.मित्रा सोबत शेतातील शेततळयात पोहण्यासाठी अनिल उर्फ पिंकू बबन खरे  (२५ ) रा. खोब्रागड़े नगर नांदेड़ व अवघुत आबागोड कोतलवाड ( २४)  दोघे रा.पोर्णिमा नगर नांदेड हे गेले आसता पाण्याचा अंदाज न लागल्याने दोघेही पाण्यात बुडाले दोघांनाही पक्के पोहणे येत नव्हते. तेथे आसलेल्या युवकांच्या लक्षात हि बाब येताच त्यांनी इतरत्र माहीती दिली.वसमत येथील अग्णिशामक दलास पाचारण करण्यात आले होते.दोन तास पाण्यात शोध घेतल्या नंतर दोन्ही प्रेत सापडले. घटनास्थळी सपोनि सुनिल गोपिनवाड,बी.टी केंद्रे,यांच्या सह पोलीस कर्मचार्यांनी भैट ...