Posts

Showing posts from August 3, 2020

हिंगोली जिल्ह्यात गुरुवारपासून १४ दिवस  लॉकडाऊन ,आतापर्यन्त दुसरी मोठी टाळेबंदी

Image
जिल्ह्यात गुरुवारपासून १४ दिवस  लॉकडाऊन ,आतापर्यन्त दुसरी मोठी टाळेबंदी जिल्हाधिकारी जयवंशी यांची पत्रकार परिषदेत माहिती हिंगोली - शहरासह जिल्हाभरात कोरोना रुग्णाची वाढती संख्या पाहता ,हा संसर्ग  रोखण्यासाठी संपूर्ण जिल्हाभरात सहा ते १९ ऑगस्ट या कालावधीत १४ दिवसाचा लॉकडाऊन  लागू करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे आतापर्यंतची जिल्ह्यातील ही दुसरी संचारबंदी आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (ता.३) जिल्हाकचेरीत पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी जयवंशी बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, जिल्हा माहिती अधिकारी अरुण सूर्यवंशी आदींची उपस्थिती होती. जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या कमी होण्याऐवजी वाढत आहे. त्यामुळे मागील काही दिवसापूर्वी जिल्हा व्यापारी संघाने जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले होते. आता तर लोक प्रतिनिधी, पदाधिकारी, उच्य पदस्थ अधिकाऱ्यांनाही कोरोना लागण झाल्यामुळे जिल्हा आरोग्य यंत्...

सीईओच पॉझिटिव्ह निघाल्याने जीप कार्यालयातील बुधवार पर्यंत कामकाज बंद

Image
सीईओच पॉझिटिव्ह निघाल्याने जीप कार्यालयातील बुधवार पर्यंत कामकाज राहणार बंद १६ जणांना केले कवठा येथे क्वारंटाईन , जीप इमारतिचे केले सानिटाईझ  हिंगोली - जिल्हा परिषदेच्या  सीईओनाच कोरोनाची लागण झाल्याचा पॉझिटिव्ह अहवाल रविवारी आरोग्य विभागाकडे प्राप्त होताच जिल्हा परिषदेमध्ये खळबळ उडाली होती. त्यामुळे सोमवारी जिल्हा परिषदेच्या सर्वच दालनात सानिटायझर फवारणी करून संपूर्ण इमारत निर्जंतुकीकरण करण्यात आली आहे. तर बुधवार पर्यंत सर्व कामकाज बंद राहणार असून जिल्हा परिषदेतील अधिकारी, कर्मचाऱ्यासह १६ जणांना सेनगाव तालुक्यातील कवठा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीत क्वारंटाइन करण्यात आल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी धनवंत कुमार माळी यांनी सांगितले. मागील आठ दिवसापूर्वी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील चौघांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त होताच  आरोग्य विभाग सील केला होता. आणि संपूर्ण ४४ जणांना क्वारंटाइन केले होते. त्यामुळे आरोग्य विभाग बंद केला होता. मात्र इतर विभागातील कर्मचाऱ्यात भीतीचे वातावरण पसरले होते. त्यामुळे चार पाच दिवस कार्यालयात ...